किल्ले शिवनेरी- "आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला" अशी स्थिती स्वराज्यात सर्वत्र असताना, किल्ले शिवनेरीवर एक वादळ जन्माला आले. हे वादळ होते उग्र विजांचे, हे वादळ होते स्वातंत्र्याचे, हे वादळ होते स्वाभिमानाचे आणि या वादळाचे नाव होते "शिवाजी", त्या वादळाला जन्म देणारी थोर माता होती "जिजाऊ".
अंगाई कोणतीही आई आपल्या मुलांसाठी गाते, परंतु आपल्या बछ्ड्याला स्वराज्याच्या शत्रुंबद्दल अंगाईतुन सांगणारी ती वाघिण एकच "जिजाऊ".
हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय जेथे झाला तो हा किल्ले "शिवनेरी".
This blog is for those who like trekking , adventures , natural beauty and photography. Here you will get daily Information related to all forts and also updates for next trek . So stay connected ..:-))
Sunday, November 21, 2010
Saturday, November 20, 2010
किल्ले रायगड
रायगड - पूर्वी जिथे गडावर चढण्या-उतरण्याचे धाडस फक्त वारा आणि पाणी करू शकतात असा हा बेलाग किल्ला आणि स्वराज्याची राजधानी.
या गडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग म्हणजे "शिवराज्याभिषेक". महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान.
"किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन झळाळु लागले, भारतवर्षातील, इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड, कर्नावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सार्वभौम सिंहासनाच्या जखमा रायगडावर बुजल्या. हि भूमी राजश्रीराजविराजीतसकलसौभाग्य संपन्न झाली.
"हे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा."
"पूर्वेकडील जिब्राल्टर" अशी ज्याची पूर्वी ओळख होती तो दूर्गदुर्गेश्वर "रायगड". स्वराज्याची राजधानी. रायगडाचे घेरा इतका मोठा आहे कि संपूर्ण गड फिरण्यास/जाणुन घेण्यास दोन दिवसही अपुरे आहे.
या गडाने अनुभवलेला अत्यंत दु:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. बखर म्हणते, "ते दिवस पृथ्वीकंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभूमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले." आजही शिवसमाधीचे दर्शन घेताना त्यांच्या या महान कार्याचा इतिहास डोळ्यासमोर आल्यावाचुन राहत नाही.
Monday, November 15, 2010
Greenery Seekers
Blog hit cross 300.!! :-))
thanks a lot for support and suggestions..stay in touch..!
किल्ले सिंहगड
"आधी लगीन कोंडाण्याचे" अशी गर्जना करणारे नरवीर तानाजी यांच्या अचाट पराक्रमामुळे हा किल्ला इतिहासप्रसिद्ध झाला आहे. उदेभान राठोड हा त्यावेळेस कोंडाण्याचा सरदार होता. कोंडाणा जिंकण्याच्या इर्ष्येने तानाजी आणि उदेभान यांच्यात घनघोर युद्ध झाले. तानाजींची डाव्या हातातील ढाल तुटली. त्यांनी डाव्या हाताची ढाल करून उदेभानला लढा दिला. या लढाईत दोघे ठार झाले. शिवाजी महाराजांना तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेंव्हा ते म्हणाले, "गड आला, पण माझा सिंह गेला". तेंव्हापासुन कोंडाणा किल्ला सिंहगड म्हणुन प्रसिद्ध पावला.
Sunday, November 14, 2010
किल्ले रोहीडा
किल्ले रोहीडा
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर एक सुरेख घाटरस्ता आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीडखोऱ्यात बसलेला किल्ला म्हणजे 'किल्ले रोहीडा'. रोहीडा खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती त्यातली ४१ गावे भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा हे खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते.
उंची - 3650 फुट ( ~1110 मीटर) जाण्याची वेळ - June to Feb.
Tuesday, November 9, 2010
सारसबाग दीपोत्सव २०१० video
This is first event organize by Greenery Seekers group. Please check the video of this event.
http://www.youtube.com/watch?v=1NjCoptev0A
Special thanks to our friend and cameraman Dhiraj Dhage .
Have a great day..!! :-))
http://www.youtube.com/watch?v=1NjCoptev0A
Special thanks to our friend and cameraman Dhiraj Dhage .
Have a great day..!! :-))
Friday, November 5, 2010
Monday, November 1, 2010
कोराईगड (कोरीगड)
१६५७ मध्ये महाराजांनी कोराईगड लोहगड,विसापुर, तुंग-तिकोना या किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला, या व्यतिरीक्त इतिहासात याचा फारसा उल्लेख नाही. गडावरच्या कोराईदेवीवरूनच याचे नाव कोराईगड पडले असावे. गडावर आजही सहा तोफा सुस्थित आढळतात. त्यातील सर्वात मोठ्या तोफेचे नाव "लक्ष्मी".
Subscribe to:
Posts (Atom)




