नावाप्रमाणेच मजबूत आणि बुलंद असा किल्ला. १६५७ मध्ये कल्याण-भिवंडी परिसर शिवाजी महाराजांनी जिंकुन घेतल्यावर लोहगड स्वराज्यात सामील करून घेतला. १६६५ मध्ये पुरंदराच्या तहात लोहगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि १६७० मध्ये मर्द मावळ्यांनी तो परत स्वराज्यात परत आणला. गडावरचे बांधकाम बर्यापैकी सुस्थितीत आहे. गडावरच एक डोंगराची सोंड दिसते, तोच लोहगडावरचा प्रसिद्ध "विंचुकाटा".
विंचुकाटा
लोहगड
This blog is for those who like trekking , adventures , natural beauty and photography. Here you will get daily Information related to all forts and also updates for next trek . So stay connected ..:-))
Saturday, October 30, 2010
Friday, October 29, 2010
सह्याद्री..!
इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच.
वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.
देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्या वेड्यांचा हा महाराष्ट्र.
अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवाजी महाराज". :-))
वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.
देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्या वेड्यांचा हा महाराष्ट्र.
अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवाजी महाराज". :-))
Thursday, October 28, 2010
:-)
या निसर्गानं लळा लावला असा असा की,
सुखदु:खाला परस्परांशी हसलो- रडलो.
आता तर हा जीवच अवघा, असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. :-))
सुखदु:खाला परस्परांशी हसलो- रडलो.
आता तर हा जीवच अवघा, असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. :-))
Tuesday, October 26, 2010
Raireshwar - Nature Trek
रायरेश्वर पठार ऐतिहासिक ठिकाण
जिथे शिवाजी राजांनी स्वराज्याची शपथ घेतली, आणि अद्वितीय इतिहास घडवला,
निसर्ग रम्य ठिकाण
जिथे वाट जाते खळखळनार्या धबधबे, उंच वुक्षराजीतून,
जीविविधतेने भरपूर ठिकाण
जिथे अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, आनंदाने बागडतात,
दुर्मिळ रानफुलांनी बहरलेले पठार
जिथे निसर्गाने विविध रंगांची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. :-))
जिथे शिवाजी राजांनी स्वराज्याची शपथ घेतली, आणि अद्वितीय इतिहास घडवला,
निसर्ग रम्य ठिकाण
जिथे वाट जाते खळखळनार्या धबधबे, उंच वुक्षराजीतून,
जीविविधतेने भरपूर ठिकाण
जिथे अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, आनंदाने बागडतात,
दुर्मिळ रानफुलांनी बहरलेले पठार
जिथे निसर्गाने विविध रंगांची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. :-))
Monday, October 25, 2010
कनकदुर्ग-गोवागड
हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे होय.
हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.
हर्णेच्या किनार्यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्यांचा मार्ग आहे. या पायर्यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.
कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.
फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.
जर आपण संध्याकाळच्या वेळेस येथे असू तर कनकदुर्गच्या किनार्यावरील मासळी बाजार अवश्य पहाण्याजोगा आहे. अर्थात खवय्यासाठीतर ही सुवर्णसंधीच होय.
हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.
हर्णेच्या किनार्यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्यांचा मार्ग आहे. या पायर्यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.
कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.
फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.
जर आपण संध्याकाळच्या वेळेस येथे असू तर कनकदुर्गच्या किनार्यावरील मासळी बाजार अवश्य पहाण्याजोगा आहे. अर्थात खवय्यासाठीतर ही सुवर्णसंधीच होय.
Greenery Seekers!
रायगडाच्या बालेकील्यावरून दिसणारा सूर्योदय. राजगडाच्या संजीवनी माचीवरून अस्ताला जाताना दर्याची सुवर्णरेखा चमकावणारा सुर्यनारायण,.हरीश्चान्द्रगडाच्या कोकणकड्यावरून दिसणारे इंद्रवज्र.
कळसुबाई शिखराच्या खांद्यावरून वाहणारे निर्मल झरे आणि सोसाट्याचा वारा , राजमाचीच्या जुळ्या किल्यांवरून दिसणारे तळकोकणातील द्रुष्य ..सज्जनगडावरून सकाळी एकू येणारे मनाचे श्लोक आणि प्रसन घंटानाद ..
अपरिचित हिरव्या वाटेची शांतता ...हे फक्त अनुभवाचे क्षण ...त्यांना शब्दाच्या ओंझळीत पकडता येणार नाही..
न रुळलेल्या , हिरव्या - पिवळ्या , फुलांनी नटलेल्या पाऊलवाटेवरून भटकताना निसर्गाच्या नवंनवीन रूपांचे दर्शन घडते ...
मराठेशाहीचा पाया रचणाऱ्या पवित्र शिवचरणाना स्मरून अशा सुंदर अनुभवांना सामोरे जाणाऱ्या डोंगर भटक्यांसाठी , छायाचित्रकारांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत Greenery Seekers ...एक आनंदयात्रा ... :-))
कळसुबाई शिखराच्या खांद्यावरून वाहणारे निर्मल झरे आणि सोसाट्याचा वारा , राजमाचीच्या जुळ्या किल्यांवरून दिसणारे तळकोकणातील द्रुष्य ..सज्जनगडावरून सकाळी एकू येणारे मनाचे श्लोक आणि प्रसन घंटानाद ..
अपरिचित हिरव्या वाटेची शांतता ...हे फक्त अनुभवाचे क्षण ...त्यांना शब्दाच्या ओंझळीत पकडता येणार नाही..
न रुळलेल्या , हिरव्या - पिवळ्या , फुलांनी नटलेल्या पाऊलवाटेवरून भटकताना निसर्गाच्या नवंनवीन रूपांचे दर्शन घडते ...
मराठेशाहीचा पाया रचणाऱ्या पवित्र शिवचरणाना स्मरून अशा सुंदर अनुभवांना सामोरे जाणाऱ्या डोंगर भटक्यांसाठी , छायाचित्रकारांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत Greenery Seekers ...एक आनंदयात्रा ... :-))
Subscribe to:
Posts (Atom)



